डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.


मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1907 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बी.ए. पदवी घेतली. यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्कमध्ये मास्टर्स ऑफ आर्ट्ससाठी प्रवेश घेतला आणि 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली. 1916 मध्ये त्यांनी ग्रेज इन येथे बार कोर्ससाठी प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात आणखी एक डॉक्टरेट पदवी पूर्ण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 64 विषयात मास्टर्स होते आणि त्यांना 11 भाषां लिहिता वाचता आणि बोलता येत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व केले होते. जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा आणि न्यायमंत्री म्हणून काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *